ताज्या बातम्या

'निती गलत हो सकती है नियत नही'; राजनाथ सिंहांनी नेहरुंबद्दल केलेलं वक्तव्य ठरतंय चर्चेचं कारण

कारगिल विजय दिवसापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) रविवारी जम्मूमध्ये पोहोचले.

Published by : Sudhir Kakde

कारगिल विजय दिवसापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) रविवारी जम्मूमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी 1999 च्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या हौतात्म्याचं स्मरण केलं. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, "मी त्या सर्व सैनिकांचं स्मरण करतो ज्यांनी देशसेवेत आपले प्राण अर्पण केले. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा आपल्या सैनिकांनी सर्वोच्च बलिदान दिलं आहे. 1999 च्या युद्धात ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्व जवानांना मी सलाम करतो."

नेहरूंबद्दल राजनाथ सिंह काय म्हणाले?

या कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. 1962 च्या युद्धाबाबत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, '1962 मध्ये चीनने लडाखमध्ये आमच्या जमिनीवर कब्जा केला. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही. पंतप्रधानांच्या हेतूंमध्ये कोणताही दोष असू शकत नाही, मात्र धोरण चुकू शकतात. मात्र, आता भारत जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.

पाक व्याप्त काश्मीरबद्दल बोलताना संरक्षण मंत्री म्हणाले, आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होतोय. भारत बोलतो तेव्हा जग ऐकतं. 1962 मध्ये आमचं जे नुकसान झालं त्याची आम्हाला जाणीव आहे. ते नुकसान आजपर्यंत भरून निघालेलं नाही. पण आता देश मजबूत आहे. पीओकेबद्दल बोलताना ते म्हणाले, यासंदर्भात भारताच्या संसदेत ठराव मंजूर करण्यात आला होता. हा भाग भारताचा होता आणि भारताचाच राहील. बाबा अमरनाथ आपल्यासोबत आहेत आणि आई शारदा सीमेपलीकडे आहे असं होऊ शकत नाही असं राजनाथ सिंह म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला