ताज्या बातम्या

बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था झालीय सरकारची : राजू शेट्टी

Published by : Team Lokshahi

विलास कोकरे|बारामती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे इंदापूर दौऱ्यावरती आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टींनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेट्टी म्हणाले की, सरकारची बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था झाली आहे.

जर सरकारला कांदा खरेदी करायचा होता तर नाफेडणे कांदा का विकला ? असा सवाल उपस्थित करत तो कांदा बाजारात आणल्याने कांद्याचे बाजार भाव पडले आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालं याला केवळ सरकार जबाबदार असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.

या नुकसानीला जबाबदार कोण ? यामुळे सरकारकडे शेतकऱ्यांविषयी काही धोरण आहे की नाही, असा सवाल राजू शेट्टी न्यू उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले आहे. हे बरोबर नाही. त्यामुळे सरकारने असले माकड चाळे करू नयेत, असा टोला देखील शेट्टीने लगावला आहे.

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...