ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या पत्राला काही अर्थ नाही - रामदास आठवले

अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भाजपनं निवडणूकीतून माघार घ्यावी , असं आवाहन केलंय.

Published by : Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे, वर्धा

अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भाजपनं निवडणूकीतून माघार घ्यावी, असं आवाहन केलंय. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरे यांच्या पात्राला काही अर्थ नाही,राज ठाकरेंचं मत असलं तरी निवडणूक लढली पाहिजे, असं आठवले म्हणालेत. नागपूरहून चंद्रपूरला जात असताना हिंगणघाट येथील कार्यक्रमात ते थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..

शिवसेनेच्या ऋुतूजा लटके उमेदवार आहेत. त्या ठिकाणी रिपाइंन भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठींबा दिला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत दलित समाज मोठ्या संख्येने राहणार आहे. त्यामुळे जो अंधेरी पूर्वचा जो गड आहे तो आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या फरकाने आमचा उमेदवार निवडूण येईल, असंही रामदास आठवले म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश