Ujjwal Nikam Team Lokshahi
ताज्या बातम्या

राजद्रोहाच्या कलमाबाबत काय म्हणतात, विशेष सरकारी वकील

एखादे भाषण, लिखाण किंवा कृतीद्वारे सरकारची बदनामी केली तर लावले जाते हे कलम

Published by : Team Lokshahi

प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Navneet Rana and MLA Ravi Rana) यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी आपले मत मांडले.

काय आहे कलम

एखादे भाषण, लिखाण किंवा कृतीद्वारे सरकारची बदनामी केली तर ती दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी तयार केलेले राजद्रोहाचे कलम आजही आहे. भारतीय राज्य घटनेत तर प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे या कलमात आता सुधारणा झाली पाहिजे, असं मत अनेकांनी नोंदवले आहे.

उज्ज्वल निकम म्हणतात?

राजद्रोहाच्या कलमावर उज्ज्वल निकम म्हणाले, राजद्रोहाचे कलम कलम ब्रिटिशांनी इंडियन पिनल कोड केलं तेव्हापासून आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी अमानूष पद्धतीने या कलमाचा वापर झाला. सातत्याने तेव्हापासून या कलमात सुधारणाची मागणी होत आहे. 124 (अ) असं हे कलम असून यात कुणाचं भाषण किंवा लेखन स्वातंत्र्यामुळे सरकारची बदनामी झाली तर तो राजद्रोहाचा गुन्हा मानला जातो. घटनेने बोलण्याचा आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकांना दिलं आहे. परंतु या कलमामुळे त्यावर मर्यादा येतात. सर्वोच्च न्यायालयासमोर हा प्रश्न प्रलंबित आहे. माझ्या मते, राजद्रोहाच्या कलमात संशोधन होणं आवश्यक आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?