Admin
ताज्या बातम्या

तेव्हा उद्धव ठाकरे यांची दातखिळी बसली होती का? रावसाहेब दानवेंचा सवाल

शिंदे - ठाकरे गट एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात.

Published by : Siddhi Naringrekar

शिंदे - ठाकरे गट एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत असतात. शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014नंतर पीक विम्याचे नियम बदलले. त्यामुळे शेतकरी विमा भरायला लागले. शेतकऱ्यांना विमाही मिळू लागला. सरकार शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करते आहे. कोविड येण्याआधीच मोदींनी सहा महिने आधी तयारी केली होती. लस नव्हती ती तयार केली. असे दानवे म्हणाले.

त्यासोबतच ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे हातवर करून शेतकऱ्यांवर बोलतात. यांना शेती माहीत आहे का? शेतकरी भेटले तरी म्हणायचे माझे कुटुंब माझी जबाबदारी. यांनी अडीच वर्षे काय केले? तर घरात बसले. उद्धव ठाकरे आणि अमित शाह घरात गेले. बंददाराआड चर्चा केली. दोघे अर्ध्या तासात बाहेर आले आणि जाहीर केलं भाजपचाच मुख्यमंत्री होणार. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची दातखिळी बसली होती का? असा सवाल दानवे यांनी केला. नाव असते पण पक्ष कुणाच्या बापाचा नसतो. असे दानवे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gaza Situation : अन्न-पाण्यासाठी झुंजताना शेकडो पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी

Google Online Courses : गुगलच्या 'या' मोफत कोर्सेसमुळे करिअरमध्ये प्रगतीची संधी

Rohit Pawar On ED Action : '...आणि म्हणून माझ्या एकट्यावर EDची कारवाई केली' रोहित पवारांनी सगळंच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati : 'युनेस्को गडकिल्ल्यांचे ब्रँडींग करेल, जतन आपल्याला करायचंय'; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया