ताज्या बातम्या

Mohan Bhagwat : मोहन भागवतांचे हिंदू बाबत मोठ वक्तव्य "जोपर्यंत हिंदू समाज..."

हिंदू समाजाबाबत भागवतांचे विचार: एकतेतच सुरक्षा.

Published by : Riddhi Vanne

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदू समाजाबाबत विधान केलं आहे. यावेळी त्यांनी समाजाच्या एकतेवर भर दिला आहे. भारताची एकताच हिंदूंची सुरक्षा करू शकते. हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी तळागाळापर्यंत जोडलेले आहेत. जेव्हा हिंदू समाज मजबूत होईल तेव्हाच भारताला वैभव प्राप्त होईल, असं मत त्यांनी मांडलं आहे. आरएसएसच्या मुखपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. शेजारील देशांमध्ये हिंदूंवरील अत्याचार आणि मानवाधिकार संघटनांनी बाळगलेलं मौन यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ‘जोपर्यंत हिंदू समाज स्वतः मजबूत होत नाही तोपर्यंत जगात कोणीही त्यांची काळजी करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी