ताज्या बातम्या

टोमॅटो खाल्ला नाही तर शेट्टी मरणार नाही - रविकांत तुपकर

महागाईचा आलेख वाढतच चालला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महागाईचा आलेख वाढतच चालला आहे. महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. यासर्व महागाईचा त्रास सामन्यांना होत आहे. टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती की, टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांच्या पत्नीचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे. असे म्हटले होते.

यावर आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुनील शेट्टीवर टीका केली आहे. रविकांत तुपकर म्हणाले की, दोन चार वर्षात एखादाच महिना असा येतो की टोमॅटो किंवा कांद्याचे भाव वाढतात. त्यातून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात. लोक हे त्यांचे भांडवल करतात, त्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते. जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टीने टोमॅटो खाऊ नये, शेट्टी काही मरणार नाही, मात्र शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करू नये. असे रविकांत तुपकर म्हणाले.

तसेच शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीसुद्धा सुनील शेट्टीवर हल्लाबोल केला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, शेतकऱ्याची भूमिका साकारण्यासाठी कोट्यवधी रुपये घेता, मग शेतकऱ्याला चार पैसे मिळाले तर पोटात दुखतंय का? सडक्या विचाराचा सुनील शेट्टी भिक मागायला आला तर त्याला सडके टोमॅटोच द्या, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Panchayat actor Asif Khan : "आयुष्यात काहीही होऊ शकतं..." – 'पंचायत' फेम आसिफ खानला हार्ट अटॅक; शेअर केली भावनिक पोस्ट

Nitin Gadkari : "महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही..." केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या स्फोटक मुलाखतीत राज ठाकरेंबद्दल महत्त्वाचे संकेत!

Nimisha Priya : येमेनमध्ये असणाऱ्या केरळच्या नर्स निमिषा प्रियाच्या फाशीला तूर्तास स्थगिती ; कुटुंबाला दिलासा