ताज्या बातम्या

RCB In Finals IPL 2025 : RCB ची फायनल्समध्ये दमदार एन्ट्री; PBKS विरोधात 8 गडी राखून सामना जिंकला

अखेर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्सची टीम आयपीएलच्या फायनल्समध्ये पोहोचली.

Published by : Rashmi Mane

अखेर रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्सची टीम आयपीएलच्या फायनल्समध्ये पोहोचली. आज, गुरुवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर राऊंडमध्ये आरसीबीनं पंजाब किंग्जला मात देत आयपीएल 2015 च्या अंतिम सामन्यासाठी खेळणाऱ्या पहिल्या संघाचा मान मिळवला आहे. आरसीबीनं सामना सुरू झाल्यावर टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर पंजाबच्या संपूर्ण टीमला अवघ्या 101 धावांवर रोखले. त्यामुळे आरसीबीसमोर केवळ 102 धावांचे आव्हान होते. हे आव्हान आरसीबीनं 10 ओव्हर्समध्ये केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले.

आरसीबीने नऊ वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि 2009, 2011 आणि 2016 मध्ये उपविजेतेपद मिळवल्यानंतर एकूण चौथ्या क्रमांकावर राहिला. 1 जून रोजी होणाऱ्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी सामना खेळल्याने पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळेल. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा संघ 14.1 षटकांत फक्त 101 धावांवर गारद झाला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा