ताज्या बातम्या

Rohit Pawar : ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही, तर सामान्य लोकांच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत झाले.

Published by : Siddhi Naringrekar

आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होत झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी जेव्हा आपण केली. त्यावेळेस कोणालाच माहित नव्हते काय होणार आहे? त्यामुळे आता पवार साहेब राऊत साहेबांशी बोलतील. उद्धव ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचं नेते त्याठिकाणी बोलतील. त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्रीपदाची नाही, पण ही लढाई स्वाभिमानाची आहे, सामान्य लोकांच्या हिताचे सरकार या महाराष्ट्रामध्ये आणण्याची लढाई आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आपल्या या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि सामान्य जनतेनं प्रयत्न करावे. पदासाठी लढण्यापेक्षा विचारासाठी लढत याच राज्यामध्ये भाजपाला हद्दपार करण्याची खऱ्याअर्थाने वेळ आलेली आहे. असे रोहित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Latest Marathi News Update live : नागपुरात आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबीर

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा

Neeraj Chopra : जागतिक स्पर्धेत नीरज आठव्या स्थानी; तर सचिन यादवची लक्षवेधी कामगिरी