ताज्या बातम्या

Rohit Pawar : भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला?

भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महाड येथे मनुस्मृतीचं दहन करत आव्हाडांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला पोस्टर फाडला. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावरच आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले की, ज्यांच्या नसानसात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्या डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांनी तत्काळ जाहीर माफीही मागितली आणि आंबेडकरी जनतेने त्यांना माफही केलं. पण पोर्शे कार अपघातात देशभरात नाक कापल्याने या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपकडून आंदोलन केलं जातंय.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला? आणि खरंच मनापासून प्रेम असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजपा दाखवणार आहे का? असे रोहित पवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा