ताज्या बातम्या

आरपीआयला दोन जागा द्या, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची भाजपकडे मागणी; म्हणाले,"शिर्डी मतदारसंघातून..."

रामदास आठवले म्हणाले, २००९ मध्ये शिर्डी मतदारसंघातून मी पराभूत झालो होतो, पण...

Published by : Team Lokshahi

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जागावाटपाबाबत खलबतं सुरु आहेत. महायुतीचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटला नसताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आरपीआयला लोकसभा निवडणुकीत दोन जागा देण्याची मागणी केलीय. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असल्याचं आठवले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

आठवले माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, महाराष्ट्रात ज्या ४८ जागा आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आरपीआय आहे. पण आरपीआयला दोन जागा मिळाल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. २००९ मध्ये शिर्डी मतदारसंघातून मी पराभूत झालो होतो. यावेळी मी शिर्डी लोकसभा मतदार संघातून उभा राहण्यासाठी इच्छूक आहे. शिर्डी सोलापूर मतदारसंघासाठी आरपीआयला जागा मिळावी. यासाठी मी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नाहीय. जागावाटपासाठी सर्वच पक्ष चर्चासत्र घेत असून ज्येष्ठ नेत्यांना याबाबत विचारणा करत आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि युतीच्या सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरुच असून जागावाटपाबाबत या पक्षांची भूमिका काय असणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?