Mohan Bhagwat Team Lokshahi
ताज्या बातम्या

"येत्या १५ वर्षांत अखंड भारत बनेल, जे आडवे येतील ते नष्ट होतील"

सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे.

Published by : Sudhir Kakde

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या एक नवा वाद निर्माण झाला आहे. येणाऱ्या १५ वर्षांत भारत हा अखंड भारत बनेल. आपण सर्वजण आपल्या डोळ्याने हे चित्र पाहू, सनातन धर्म हाच हिंदूराष्ट्र (Hindurashtra) आहे. आमच्या मनात कुणाबद्दल द्वेष नाही, आम्ही हे काम अहिंसेच्या मार्गाने, मात्र तरीही हातात लाठी घेऊ. तसंच जे लोक या कामात आडवे येतील ते नष्ट होतील असंही ते पुढे म्हणाले आहेत.

संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा अखंड भारताबद्दल मोठं विधान केलं आहे. सनातन धर्म हाच हिंदू राष्ट्र आहे, एवढंच नाही तर २० ते २५ वर्षांत भारत अखंड भारत होईल, असंही ते म्हणाले. तसंच जर थोडा प्रयत्न केला तर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातील अखंड भारत १० ते १५ वर्षात साकार होईल. त्याला कोणीही रोखू शकणार नाही, जे या मार्गात येतील त्यांचा नाश होईल असं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Wardha Crime : शिक्षणासाठी पैसे नसल्याने 17 वर्षीय तरुणीने नैराश्यातून जीवन संपवले

Panchayat Season 5 : प्रेक्षकांना बघायला मिळणार आजी-माजी सरपंचांची लढाई; पुढील वर्षात येणार पंचायत 5 सीझन

Jitendra Awhad On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले, "मराठी माणसाची तुलना पहलगामच्या घटनेशी.."

Shivsena : "राज ठाकरेंच्या विरोधात नाही, पण उद्धव ठाकरे..." शिंदेंच्या शिवसेनेकडून विजयी मेळाव्यावर मोठ वक्तव्य