ताज्या बातम्या

RTI : 11.7 कोटी मृत्यू असूनही फक्त 10% आधार निष्क्रिय, UIDAI च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

11.7 कोटी मृत्यू असूनही फक्त 10% आधार निष्क्रिय: UIDAI च्या प्रक्रियेवर संशय

Published by : Team Lokshahi

देशात नागरिकांची डिजिटल ओळख म्हणून वापरल्या जाणाऱ्या आधारकार्ड व्यवस्थेविषयी एक महत्त्वपूर्ण खुलासा माहितीच्या अधिकारातून (RTI) समोर आला आहे. गेल्या 14 वर्षांत देशात सुमारे 11.7 कोटी नागरिकांचे निधन झाले असले, तरी त्याच कालावधीत फक्त 1.15 कोटी आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले असल्याचे उघड झाले आहे.

आकडेवारीतून मोठी तफावत

संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाच्या अंदाजानुसार, भारताची एकूण लोकसंख्या एप्रिल 2025 मध्ये 146.39 कोटी इतकी आहे, त्यापैकी 142.39 कोटी लोकांकडे आधारकार्ड आहे. दुसरीकडे, भारताच्या नागरी नोंदणी प्रणाली (CRS) च्या माहितीनुसार 2007 ते 2019 या काळात दरवर्षी सरासरी 83.5 लाख मृत्यू झाले. यानुसार 14 वर्षांत मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 11.69 कोटींपर्यंत जाते. मात्र, UIDAI ने फक्त 1.15 कोटी आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत, जे एकूण मृत्यूच्या फक्त 10 टक्के आहे.

आधार नसलेल्या लोकांची माहिती UIDAI कडेच नाही

RTI अंतर्गत विचारण्यात आले की देशात किती लोकांकडे आधारकार्ड नाही, त्यावर UIDAI ने कोणतीही निश्चित आकडेवारी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. UIDAI च्या म्हणण्यानुसार, आधार निष्क्रिय करण्याची प्रक्रिया तेव्हाच सुरू होते जेव्हा नोंदणी अधिकाऱ्यांकडून आधार क्रमांकासह मृत्यूची नोंद दिली जाते. यामध्ये नाव आणि लिंगाच्या सुसंगतीसाठी विशिष्ट टक्केवारीचे निकष लागू केले जातात – नाव 90% जुळणे आवश्यक असून, लिंग 100% जुळणे आवश्यक आहे.

बायोमेट्रिक पडताळणीची भूमिका

जर ही दोन अटी पूर्ण झाल्या आणि त्या क्रमांकाशी संबंधित बायोमेट्रिक क्रियाशीलता आढळली नाही, तरच तो आधार क्रमांक निष्क्रिय केला जातो. काही वेळा मृत व्यक्तीचा आधार क्रमांक मृत्यूनंतरही वापरात असल्याचे आढळल्यास पुढील तपास केला जातो. अशी संधीही असते की चुकीने निष्क्रिय केलेला आधार बायोमेट्रिक पडताळणीच्या आधारे पुन्हा सक्रीय करता येतो.

बिहारमधील सॅच्युरेशनचे धक्कादायक आकडे

बिहारमध्ये निवडणूक विशेष संक्षिप्त पुनरावलोकनाच्या वेळी काही जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांहून अधिक आधार सॅच्युरेशन नोंदवले गेले. किशनगंज जिल्ह्यात 126%, कटिहार आणि अररिया येथे 123%, पूर्णिया 121% आणि शेखपूरा 118% सॅच्युरेशन नोंदले गेले, जे प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानले जात आहे.

दरवर्षी निष्क्रिय केलेल्या आधार क्रमांकांचा तपशील नाही

RTI अंतर्गत विचारण्यात आले की मागील पाच वर्षांत दरवर्षी किती आधार निष्क्रिय केले गेले, यावर UIDAI कडे कोणतीही विशिष्ट वर्षनिहाय माहिती नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी फक्त एकूण आकडा दिला – 31 डिसेंबर 2024 पर्यंत 1.15 कोटी आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा