ताज्या बातम्या

India Pakistan War : 'पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवादावर'; परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट

दोन्ही देशांमधील तणावपूर्ण वातावरणात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं आहे

Published by : Rashmi Mane

भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतरही पाकिस्ताननं कुरापती केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणावपूर्ण वातावरणात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला ठणकावलं आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमध्ये सिंधू पाणी करार स्थगितीचा महत्वाचा निर्णय समोर आला होता. हा सिंधू पाणी करार स्थगितीचा निर्णय कायम राहणार असल्याचे एस. जयशंकर म्हणाले. तसेच पाकिस्तानशी चर्चा केवळ दहशतवादावर, असेही त्यांनी पाकिस्तानला ठणकावलं. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीवरून सुरू असलेल्या चर्चांना अप्रत्यक्षपणे उत्तर देताना त्यांनी पीओकेबाबत तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य नाही, असे म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा