ताज्या बातम्या

Marathi Sahitya Sammelan Delhi: दिल्लीमध्ये ७० वर्षांनी मराठी साहित्य संमेलन; पंतप्रधानांच्या आगमनामुळे उद्घाटन स्थळात बदल?

दिल्लीमध्ये ७० वर्षांनी साहित्य संमेलन; पंतप्रधानांच्या आगमनामुळे उद्घाटनस्थळात बदल होण्याची शक्यता.

Published by : Team Lokshahi

तब्बल 70वर्षांनंतर राजधानी दिल्लीमध्ये फेब्रुवारी 2025मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अधिकृतरीत्या निमंत्रित करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये होत असलेल्या आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारल्यास सुरक्षेच्या दृष्टीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विज्ञान भवनात उद्घाटन सोहळा करण्याचे नियोजन आहे.केंद्र सरकारने 3ऑक्टोबरला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. शिवाय शरद पवार स्वागताध्यक्ष असतील तर संमेलनाच्या मंचावर ‘राजकीय संतुलन’ साधण्यासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधानांना बोलवावे, अशी मागणी पुढे आली होती.

साहित्य महामंडळाचीही तशीच इच्छा होती. याची ‘दखल’ शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केले आहे. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मात्र मोदी येणार असतील तर बैठक व्यवस्थेत करावे लागणारे बदल, या सर्व बाबी लक्षात घेता उद्घाटन सोहळा विज्ञान भवनात करायचा व प्रसारण तालकटोरा मैदानातील संमेलनस्थळी करायचे, असा पर्याय आयोजकांनी सुचवला आहे. 1954साली दिल्लीत साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते झाले होत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज