ताज्या बातम्या

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक; संजय राऊत यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर आहे. ज्याप्रकारे निवडणुकी रोखे घोटाळा भारतीय जनता पक्षावर शेकलेला आहे हजारो कोटी रुपये खंडणीच्या माध्यमातून, वसुलीच्या माध्यमातून, दहशतीच्या माध्यमातून गोळा केलेत. भारतीय जनता पार्टी स्वत:ला हिंदुत्वावादी समजते. भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रोखे चेक करा. मद्य धोरण घोटाळ्यातील ठेकेदारांनी भाजपाला निधी दिला आहे. हेमंत सोरेनला आपण अटक केली.

केजरीवाल यांना अटक केली. आपण मंत्र्यांना अटक करता. सगळ्यात भ्रष्ट सरकार देशात आणि महाराष्ट्रात तुमचं आहे आणि ज्यांना अटक केली पाहिजे त्यांना तुम्ही मंत्री करता, उपमुख्यमंत्री करता. याला हुकूमशाही म्हणतात. त्याच हुकूमशाहीविरुद्ध आम्ही लढतो आहे. उद्या ते कोणालाही अटक करु शकतात. मोदींना, अमित शाहांना ज्यांच्यापासून भिती वाटते की आम्हाला हरवू शकतील. त्या सगळ्यांना हे अटक करु शकतात. सरकारला भिती वाटते आहे. निवडणूक हरण्याची. लोकांचा उठाव होण्याची. त्याच्यामुळे हे सगळं नेते तुरुंगात टाकू इच्छितात.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना