ताज्या बातम्या

पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली; ती गदा त्यांच्यात डोक्यात बसली - संजय राऊत

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला.

Published by : Siddhi Naringrekar

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो. त्यात संघाचे लोकही आहेत. हिंदुत्व ही आमची राजकीय रोजीरोटी नाही. हिंदुत्व ही आमची श्रद्धा, संस्कार आणि संस्कृती आहे. ज्यांचे ते नाही ते अशा दंगली घडवत आहेत. असे राऊत म्हणाले.

तसेच ते म्हणाले की, पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली. ती गदा तुमच्याच डोक्यात बसली. हनुमान चालीसा करून वातावरण बिघडवता हे तुमचे धंदे आहेत. राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती. त्यावर एसआयटी नेमली का नाही नेमली? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा