ताज्या बातम्या

पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली; ती गदा त्यांच्यात डोक्यात बसली - संजय राऊत

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला.

Published by : Siddhi Naringrekar

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाने आत घुसून काही मुस्लिम मंडळीने चादर चढवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे.

मंदिराच्या दारावर देवाला धूप दाखवून पुढे जातात. देशात या परंपरा सर्वत्र आहेत. मोदींपासून आम्ही सगळे अजमेर शरीफला जातो. माहीम आणि हाजी अलीच्या दर्ग्यात जातो. त्यात संघाचे लोकही आहेत. हिंदुत्व ही आमची राजकीय रोजीरोटी नाही. हिंदुत्व ही आमची श्रद्धा, संस्कार आणि संस्कृती आहे. ज्यांचे ते नाही ते अशा दंगली घडवत आहेत. असे राऊत म्हणाले.

तसेच ते म्हणाले की, पंतप्रधानांनी बजरंग बलीची गदा फिरवली. ती गदा तुमच्याच डोक्यात बसली. हनुमान चालीसा करून वातावरण बिघडवता हे तुमचे धंदे आहेत. राम नवमी संदर्भात एसआयटी नेमली का? राम नवमीला कधी नव्हे त्या दंगली झाल्या. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात दंगल झाली नव्हती. त्यावर एसआयटी नेमली का नाही नेमली? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

IND vs PAK: दुबईत भारताची कामगिरी फिक्की, किती सामने जिंकलेत?, जाणून घ्या...

Sahitya Sangh Mandir : गिरगावचे साहित्य संघ राजकारणाच्या भोवऱ्यात?

Latest Marathi News Update live : मुंबईसह ठाण्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज…

Weather News : मुंबईत काळ्या ढगांची गर्दी; पुढील तासांत मुसळधार पावसाची शक्यता