ताज्या बातम्या

जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणते, काल कोर्टानेही तेच म्हटलं - संजय राऊत

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणते, काल कोर्टानेही तेच म्हटलं. संभाजीनगरमध्ये जो तणाव निर्माण झाला त्याला राज्य सरकार जबाबदार आहे असे राऊत म्हणाले.

यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, फडणवीसांचे काम नैराश्यातून सुरु आहे. राज्यात दंगली घडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे हे नेहमी गुलाम असल्याची जाणीव करुन देतात. शिंदेंचे दिल्लीच्या आदेशावरच काम चालतं. असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले की, कोर्टाच्या टीप्पणीने सरकारची औकात कळली आहे. शिंदे सरकारचा जीव हा खोक्यात आहे. असे राऊत यांनी म्हटले आहे.

Beed: बीडमध्ये चंदन तस्करी; निवडणुकीच्या धामधुमीत दोन कोटींचे चंदन जप्त

Eknath Shinde On Wadettiwar: वड्डेटीवाराचं डोकं फिरलं आहे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका

Shantigiri Maharaj: नाशिक लोकसभेतून माघारीचा अखेरचा दिवस, शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम

Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद? घाटकोपरमधील गुजराती बहुल सोसायटीतील प्रकार

दिंडोरी लोकसभेतून अखेर जे पी गावित यांची माघार; म्हणाले...