ताज्या बातम्या

जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणते, काल कोर्टानेही तेच म्हटलं - संजय राऊत

संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जनता शिंदे सरकारला नपुंसक म्हणते, काल कोर्टानेही तेच म्हटलं. संभाजीनगरमध्ये जो तणाव निर्माण झाला त्याला राज्य सरकार जबाबदार आहे असे राऊत म्हणाले.

यासोबतच त्यांनी म्हटले आहे की, फडणवीसांचे काम नैराश्यातून सुरु आहे. राज्यात दंगली घडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे हे नेहमी गुलाम असल्याची जाणीव करुन देतात. शिंदेंचे दिल्लीच्या आदेशावरच काम चालतं. असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले की, कोर्टाच्या टीप्पणीने सरकारची औकात कळली आहे. शिंदे सरकारचा जीव हा खोक्यात आहे. असे राऊत यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा