Sanjay Raut-Eknath shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

Petrol-Diesel दरात कपात झाल्यावर संजय राऊत म्हणाले, जनतेच्या...

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी का होत नाही असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Published by : Sudhir Kakde

शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर पक्षासमोर आता संघटना टिकवण्याचं नवं आव्हान निर्माण झालं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे यापार्श्वभूमीवर नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, नागपूर आणि आजुबाजूच्या परिसरात कोणीही कुठेही गेलेलं नाही, सर्व लोक जागेवर आहेत. कुणाचे कार्यकर्ते आले, गेले हे पाहण्यासाठी आम्हाला वेळ नसून, आता फक्त पक्ष आणि पक्ष हा एकच विषय आहे असं राऊत म्हणाले. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात असतील त्याचं स्वागत करायलं हवं असं संजय राऊत नागपुरात म्हणाले. मागच्या सरकारने घेतलेले निर्णय विनाकारण रद्द केले जात आहेत, विरोधाला विरोध म्हणून काम केलं जात असेल तर ते चुकीचं आहे. मुळात हे सरकारच बेकायदेशीर असून, आणखी सरकार का अस्तित्वात आलं नाही? फक्त मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली असं राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?