ताज्या बातम्या

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना

महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा आज शिवाजी पार्कवर होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज होणार आहे. राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येणार असून ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात येऊन 25 - 30 सभा घेतात. मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना. लोकांना मुर्ख बनवण्यासाठी तुम्ही आता सभा घेतायत. आपण तर विकास केला असता, आपण महाराष्ट्रासाठी काही चांगल्या गोष्टी केल्या असत्या. तर अशाप्रकारे ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही असं सांगितले. त्यांना मांडीवर घेऊन बसावं नसते लागले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, जे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत ते स्वत:ला महाराष्ट्राचे स्वाभिमानी म्हणतायत. त्यासाठी आपला पक्ष स्थापन केला म्हणत आहेत. ते महाराष्ट्राच्या शत्रूंच्या बरोबर व्यासपीठावर बसतात आणि त्यांच्यावरती आज कौतुकांची फुलं उधळणार. हे चित्र महाराष्ट्राला एकदा याची देही याची डोळा पाहू द्या. म्हणून म्हटलं या निवडणुकीनंतर काही सुपारीची दुकानं बंद होणार. ती कायमची बंद होतील. असं संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?