ताज्या बातम्या

नागपुरात ठाकरे फडणवीस भेट, 15 मिनिटांत नेमकी काय चर्चा? संजय राऊत म्हणाले...

हिवाळी अधिवेशन सुरु आहे.

Published by : Siddhi Naringrekar

हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी नागपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिट चर्चा झाली. मात्र नेमकी कशावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, अनिल परब देखील उपस्थिती होते. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, जोरदार चर्चा करायला काहीच हरकत नाही. पण महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि संस्कार आहेत. माननीय उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत. विधीमंडळाचे सदस्य आहेत. ते नागपूरला गेलेले आहेत. नवीन सरकार स्थापन झालेले आहे. प्रचाराच्या व्यासपीठावरच्या ज्या तोफा असतात त्या थंड पडलेल्या आहेत.

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यांनी उत्तम प्रकारे राज्याच्या हिताचे काम करावे. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या कल्याणाचे काम करावे, अशा शुभेच्छा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री गेले असतील तर त्यात फार मोठी खळबळ माजण्याचे कारण नाही. किंबहुना देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा ही त्यांनी राज्याच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करुन त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. ही पद्धत आहे महाराष्ट्राची. असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप