ताज्या बातम्या

पावसामुळे मुंबई, ठाण्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर

परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगराला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काल बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मुंबई लोकलसेवेवर झाल्याचं पाहायला मिळाले. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाली होती.

आज देखील मुंबई, ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात असून आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनो, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा