रत्नागिरीत शिवसेना आणि भाजपचं ठरलं. आगामी निवडणूक महायुतीतून लढणार आहे. आज मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्यात आला या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री उदय सामंत राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा निर्णय झाला.