ताज्या बातम्या

"ही तर सौगात-ए-सत्ता...", उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांवर निशाणा

त्यांचे आता 32 हजार कार्यकर्ते घरोघरी जाऊन सौगात ए मोदी देणार आहेत.

Published by : Team Lokshahi

नुकतेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. यानंतर ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी हे अधिवेधन खूप निराशाजनक असल्याचे म्हंटले आहे. उद्धव ठाकरे यांनी नक्की काय काय आरोप केले? याबद्दल आपण जाणून घेऊया.

सध्याचे अधिवेशन हे कबरीपासून ते कामरापर्यंत गाजलं. पण नरेंद्र मोदी हे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यांचे आता 32 हजार कार्यकर्ते घरोघरी जाऊन सौगात ए मोदी देणार आहेत. पण हे काही सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप केले. पण आता हिंदूच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार? हिंदुत्ववादी पक्ष आता आहे का? भाजपने एकदा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं", असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू