ताज्या बातम्या

Shubhanshu Shukla : कसा असणार शुभांशू शुक्लांचा परतीचा प्रवास ? जाणून घ्या एका क्लिकवर

शुभांशु शुक्लांचा अंतराळ प्रवास: भारताच्या अंतराळ संशोधनात नवा अध्याय

Published by : Team Lokshahi

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे 17 दिवसांच्या अविस्मरणीय अंतराळ सफरीनंतर आज, 14 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4:35 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून (ISS) पृथ्वीच्या दिशेने परतीस निघणार आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये बसलेले चारही अंतराळवीर आता पृथ्वीवर परतण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. अंदाजे 23 तासांच्या प्रवासानंतर 15 जुलै रोजी दुपारी 3 वाजता कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ त्यांच्या स्पेसक्राफ्टचे स्प्लॅशडाऊन होणार आहे.

ही मोहीम केवळ भारतासाठी नव्हे, तर जागतिक पातळीवरही महत्त्वाची ठरली आहे. शुभांशु शुक्ला हे ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय आहेत, तर 41 वर्षांनंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय ठरले आहेत. त्यांनी भारताच्या वतीने एक्सियम स्पेस, नासा व स्पेसएक्स यांच्या संयुक्त ‘एक्सियम-4’ या खासगी मिशनमध्ये सहभाग घेतला. भारत सरकारने या मिशनसाठी 548 कोटी रुपये खर्च केले आहेत.

मिशन दरम्यान शुभांशु यांनी 60 हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतला. भारताच्या सात प्रयोगांचा त्यात समावेश होता, जसे की अंतराळात मेथी-मूग उगम, हाडांवरील प्रभाव आणि सूक्ष्मजीव संशोधन. त्यांनी ISS मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध शहरांतील शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधत STEM शिक्षणावरील जागरूकतेला गती दिली.

13 जुलै रोजी फेअरवेल सेरेमनीदरम्यान शुभांशु यांनी “भारत आजही सारे जहां से अच्छा” या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी अंतराळातून घेतलेल्या पृथ्वीच्या खास छायाचित्रांनी देखील जगाचे लक्ष वेधले आहे.

शुभांशु यांचा अनुभव भारताच्या आगामी गगनयान मोहिमेसाठी मोलाचा ठरेल. भारताचे हे पहिले मानवी अंतराळ मिशन 2027 मध्ये अपेक्षित असून त्यासाठी शुभांशु यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासामुळे भारताची अंतराळ संशोधनातील वाटचाल आणखी दृढ होईल, यात शंका नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे