ताज्या बातम्या

अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन्...; रविकांत तुपकर आक्रमक

शिंदे-फडणवीस सरकारचा काल (9 मार्चला) पहिला अर्थसंकल्प मांडला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

शिंदे-फडणवीस सरकारचा काल (9 मार्चला) पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांसाठी मोठ्या घोषणा शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आल्या. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत. त्यामुळे मागचे सोडून द्यायचे अन् पुढच्या घोषणा करत सुटायच्या असे रविकांत तुपकर म्हणाले.

अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर करण्यात आला आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी मदतीचं विशेष पॅकेज घोषित करणं गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा