Admin
Admin
ताज्या बातम्या

बाळासाहेब-वाजपेयींनी मैदान भरलं नाही, त्या मैदानात मी सात लाखांची गर्दी जमवली - तानाजी सावंत

Published by : Siddhi Naringrekar

शिवसेनेचे नेते आणि आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

तानाजी सावंत यांनी स्वत:ची तुलना बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याशी केली आहे. त्यांच्यापेक्षा आपण कसे वरचढ आहोत. असे त्यांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे एका कार्यक्रमात तानाजी सावंत बोलत होते. तानाजी सावंत म्हणाले की, "ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांना सुद्धा गर्दी जमवता आली नाही, तिथे सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली. ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी २०१७-१८ च्या दरम्यान केली. असे तानाजी सावंत म्हणाले.

MI VS SRH: सुर्यकुमार यादवचे नाबाद शतक! हैदराबादचे 7 गडी राखून केला पराभव

Madha Lok sabha Election 2024 : माढ्यात आचारसंहितेचा भंग, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर

Baramati : सुप्रिया सुळेंची दत्तात्रय भरणेंविरोधात तक्रार दाखल, निवडणूक आयोग कारवाई करणार का?

आमदार भरणेंनी शिवीगाळ केलेला व्हिडिओ रोहित पवारांनी केला ट्विट

हातकणंगलेमध्ये गोंधळ, दोन गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी