ताज्या बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रा.पं.चा निवडणूकांचे बिगुल वाजले

Published by : Siddhi Naringrekar

निसार शेख, रत्नागिरी

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे . त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे . त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल , अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू . पी . एस . मदान यांनी आज केली.

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८;नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील . नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर २०२२ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील . नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर २०२२ रोजी होईल . नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल .

मतदान १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल . तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल . मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी होईल .रत्नागिरी जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींची धुळवड उडणार आहे . जिल्ह्यात मंडणगडमध्ये १४ , दापोली ३० , खेड १० , चिपळूण 32, गुहागर २० , संगमेश्वर ३५ , रत्नागिरी २८ , लांजा १८ आणि राजापूरमधील ३० ग्रामपंचायतींचा समावेश आहे . यात सर्वाधिक लक्ष मंडणगड - खेड - दापोली आणि रत्नागिरी - संगमेश्वर विधानसभा मतदार संघावर राहणार आहे .

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद