Bachchu Kadu
Bachchu Kadu Team Lokshahi
ताज्या बातम्या

आम्ही सगळ्यांनी नवस केला होता म्हणून सरकार आलं, बच्चू कडू यांच मोठ विधान

Published by : shweta walge

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह 21 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहे यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्व आमदार जात आहे मी पण जाणार आहे, तर आम्ही सगळ्यांनी नवस केला होता म्हणून सरकार आलं असं मोठं विधान बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकार पडेल असं विधान केल्यानंतर यावर बच्चू कडू यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, हे सगळं येड बनवण्याच काम आहे आम्ही पण खर म्हणतं होतो की, सरकार पडलं पाहिजे ह्या सगळ्या भूलथापा आहे. आमदार फुटले नाही पाहिजे म्हणून असे विधान संजय राऊत करत आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

दरम्यान, दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे शेतकऱ्यांचे भलं झालं पाहिजे, सरकार पडलं तरी बेहतर पण शेतकरी अडचणीत नाही आला पाहिजे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळेस दिली आहे.

Rajendra Gavit : पालघर लोकसभेची उमेदवारी मला नाकारली गेली,त्यामुळे माझ्या दृष्टीने एक दु:खद घटना असं म्हणायला हरकत नाही

अमिताभ बच्चन यांच्या ट्विटवरून शिवसेना UBT-भाजप ट्विटर वॉर

निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार १० टक्के सवलत

Ravindra Waikar: उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर आज अर्ज दाखल करणार, म्हणाले...

Eknath Shinde on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडून मलाही मुख्यमंत्री पदाची ऑफर