ताज्या बातम्या

Weather Update: थंडीची वाढती लाट! हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रात नुकताच अवकाळी पाऊस बरसून गेला असताना राज्यभर पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्रात नुकताच अवकाळी पाऊस बरसून गेला असताना राज्यभर पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यात किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअस एवढे असून पुढील काही दिवसात तापमान हे २ ते ३ अंशाने वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून त्यानंतर तापमानात काहीशी घट होणार असल्याचेही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आले आहे.

पुढील काही दिवस उत्तरेकडील भागात थंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेच्या वेळेस दाट धुके आणि गारठ्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी कायम असून यासोबतच दाट धुक्याचा परिणामही दिसून येत आहे. दिल्ली एनसीआरपासून उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानपर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे. यंदाच्या थंडीने या हंगामातील सर्व विक्रम मोडीत काढले असून देशातील अनेक भागांच्या किमान तापमानात सातत्याने घट होत आहे.

दरम्यान, आयएमडीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक ठिकाणी किमान तापमान तीन ते सात अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले असून याशिवाय पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर धुके दिसून आले. तसेच पश्चिम बंगालमध्ये दाट धुके दिसून आले. दिल्लीत आज सकाळीही दाट धुके पाहायला मिळाले. आज उत्तरेकडील राज्य पंजाब, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या भागात दाट धुके पसरण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. दरम्यान पुढील 48 तासात काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप