ताज्या बातम्या

संसदेचे पावसाळी अधिवेशन 'या' तारखेपासून होणार सुरु

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : संसदेचे (Parliment) यंदाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 18 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधी दरम्यान होण्याची शक्यता आहे. संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत या तारखांची शिफारस केली गेली आहे. दरम्यान, 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणूक (Presidential Election) होणार असल्याने विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

आगामी पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत होणार असून 17 दिवस होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनादरम्यान राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र, उपराष्ट्रपती पदाची निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नाही. राष्ट्रपती निवडणुकीनेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

यंदाचे पावसाळी अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी एकजुटीने सरकारला घेरण्याच्या तयारीत असणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, वाढती महागाई, पेट्रोल-डिझेलसह इंधनाच्या वाढत्या किमतींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती निवडणुकीस विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या मनस्थितीत विरोधक नाहीत. विरोधकांकडून संयुक्त उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहेत. परंतु, निवडणूक लढविण्यास शरद पवारांनी नकार दिला असला तरीही विरोधकांकडून मनधरणीचा प्रसत्न सुरु आहे. यासाठी आज दिल्लीत विरोधकांची बैठक होणार आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...