ताज्या बातम्या

Pandharpur Ashadi Wari 2025 : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघणार दुपारऐवजी रात्री; पारंपरिक सोहळ्यामुळे पालखी प्रस्थानाच्या वेळेत बदल

यंदाच्या आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींची पंढरपूरकडे जाणारी पालखी दरवर्षीप्रमाणे दुपारी 4 वाजता निघण्याऐवजी रात्री 8 वाजता 19 जून रोजी निघणार आहे.

Published by : Team Lokshahi

यंदाच्या आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींची पंढरपूरकडे जाणारी पालखी दरवर्षीप्रमाणे दुपारी 4 वाजता निघण्याऐवजी रात्री 8 वाजता 19 जून रोजी निघणार आहे. हा बदल गुरुवारी होणाऱ्या पारंपरिक पालखी सोहळ्यामुळे करण्यात आला आहे, अशी माहिती विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि रोहिणी पवार यांनी दिली.

यंदा 19 जून रोजी पालखी प्रस्थानाचा दिवस गुरुवारी येत असल्यामुळे, दर गुरुवारी नियमानुसार होणारी "गुरुवारची पालखी" आधी निघणार आहे. त्यानंतर संध्याकाळी आरती होईल आणि त्यानंतरच पंढरपूरकडे जाणाऱ्या मुख्य पालखीचे प्रस्थान होईल. ही वेळ पुढे ढकलण्यात आली असली तरी, पारंपरिक धार्मिक विधी जपले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत वारकऱ्यांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. रोहिणी पवार यांनी सांगितले की, गुरुवारी निघणारी पालखी सूर्यास्तापूर्वी संपवली जाईल. त्यानंतर आरती झाल्यावर मुख्य प्रस्थान सोहळा सुरू होईल.

हा वेळेतील बदल म्हणजे परंपरा जपत, नियोजनबद्धपणे एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा पार पाडण्याचा प्रयत्न आहे. आषाढी वारी ही महाराष्ट्राची भक्ती, एकता आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा