ताज्या बातम्या

राज्यात आज 1 हजार 165 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागणार

राज्यात आज 1 हजार 165 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात आज 1 हजार 165 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागणार आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विविध जिल्ह्यांतील 1079 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 74 टक्के मतदान झाले. तर विविध 18 जिल्ह्यांमधील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार काल सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी काल मतदान झाले.

काल सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली तर सायंकाळी पाच पाच वाजेपर्यंत मतदान पूर्ण केले गेले. राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.

काल रविवारी सरासरी 64.83 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. थेट सरपंच कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : ठाकरेंच्या शिवसेनेचं राजव्यापी आंदोलन

Ajit Pawar : पुण्यातील समस्या सोडवण्यासाठी अजित पवारांचा जनसंवाद; हडपसरमध्ये तीन हजार तक्रारींची नोंद

Ladki Bahin Yojana : सोलापूरमध्ये लाडकी बहीण योजनेत धक्कादायक उघड: दहा हजार महिलांचा ठावठिकाणा नाही

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर सुरेश धस यांचे विधान; राजकीय वर्तुळात खळबळ