ताज्या बातम्या

Dahi Handi 2025 : आता उत्सव होणार अधिक सुरक्षित! अपघात झाल्यास गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; रक्कम जाणून घ्या

गोकुळाष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल 1.50 लाख रुपये गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Published by : Prachi Nate

गोकुळाष्टमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तब्बल 1.50 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. "गोविंदा समन्वय समिती (महा.)"च्या माध्यमातून दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई यांच्याशी भागीदारी करत ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी 1.25 लाख गोविंदांना विम्याचा लाभ मिळाला होता. मात्र, काही पथकांपर्यंत ही योजना पोहोचू शकली नव्हती.

यंदा ही मर्यादा दूर करून कव्हरेज वाढवण्यात आले असून, अतिरिक्त 25000 गोविंदांनाही यात समाविष्ट केले जाणार आहे. दहीहंडी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून, त्यात मानवी मनोरे रचून हंडी फोडली जाते. या साहसी खेळात अपघाताची शक्यता लक्षात घेता, विमा संरक्षण ही काळाची गरज बनली आहे. ही योजना अपघातजन्य उपचारांसाठी आर्थिक मदत आणि मानसिक आधार देणारी ठरणार आहे.

राज्य शासनाने या योजनेसाठी सहकार्य करत विमा प्रस्तावास मंजुरी दिली आहे. यामुळे उत्सव अधिक सुरक्षितपणे साजरा होण्यास मदत होईल. गोविंदा पथकांमध्येही या घोषणेमुळे मोठा उत्साह दिसून येतो. विमा योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ही योजना केवळ सुरक्षिततेचा आधार नाही, तर महाराष्ट्राच्या पारंपरिक उत्सवाला आधुनिक सुरक्षेचा कवच देणारी महत्त्वाची पायरी ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा