Maharashtra Police : पोलिस भरतीमध्ये पुन्हा अडथळा; 364 अधिकाऱ्यांचा आदेश केवळ 24 तासांत रद्द Maharashtra Police : पोलिस भरतीमध्ये पुन्हा अडथळा; 364 अधिकाऱ्यांचा आदेश केवळ 24 तासांत रद्द
ताज्या बातम्या

Maharashtra Police : पोलिस भरतीमध्ये पुन्हा अडथळा; 364 अधिकाऱ्यांचा आदेश केवळ 24 तासांत रद्द

महाराष्ट्र पोलीस: 364 अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द, महासंचालक कार्यालयावर टीका.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र पोलीस दलात पदोन्नतीसंबंधी मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 364 सहायक पोलीस निरीक्षकांना निरीक्षकपदी बढती देण्याचा आदेश महासंचालक कार्यालयाकडून 21 ऑगस्ट रोजी काढण्यात आला होता. पण हा आदेश फक्त एका दिवसातच रद्द करण्यात आल्याने महासंचालक कार्यालयावर टीकेची झोड उठली आहे.

मागासवर्गीयांसाठी 2004 मध्ये लागू करण्यात आलेल्या 52 टक्के आरक्षणात पदोन्नतीत 33 टक्के आरक्षणाचा समावेश करण्यात आला होता. यावर विजय घोगरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 2017 मध्ये न्यायालयाने निकाल देताना पदोन्नतीत आरक्षण शक्य नाही, असे स्पष्ट केले. राज्य सरकारने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असले तरी अद्याप स्थगिती मिळालेली नाही.

दरम्यान, 2021 मध्ये गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती धोरण लागू करण्यात आले. मात्र, 29 जुलै 2025 रोजी राज्य सरकारने पुन्हा आरक्षणावर आधारित पदोन्नतीचा मार्ग खुला केला. याविरोधात खुल्या प्रवर्गातील काही अधिकारी आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली. सुनावणीदरम्यान मॅटने राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन होऊ नये, असे बजावले.

या घडामोडीनंतर पोलिस महासंचालक कार्यालयाने घेतलेला पदोन्नतीचा निर्णय मागे घ्यावा लागला. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांनी काढलेल्या आदेशानुसार, पदोन्नती जाहीर केलेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त न करण्याचे आणि जर कार्यमुक्त केले असेल तर त्यांना मूळ विभागात परत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घडामोडीमुळे खुल्या प्रवर्गातील 500 हून अधिक पोलिस अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीची प्राण प्रतिष्ठापना; यंदाच्या गणेशोत्सवासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त

Manoj Jarange EXCLUSIVE : का अन्याय सहन करायचा? काय पाप केलं मराठा तरुणांनी? जरांगे भडकले

Manoj Jarange : जरांगेंचं भगवं वादळ मुंबईकडे; 29 ऑगस्टला आझाद मैदान गाजणार

Story Of Hartalika : हरतालिका म्हणजे काय? जाणून घ्या या व्रताची कथा