ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : 'पैसे फेकले म्हणजे सगळं काही करता येतं असं त्यांना वाटतं', उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार शब्दांत टीका करत कार्यकर्त्यांना आक्रमक पण आत्मविश्वासाने लढण्याचे आवाहन केले.

Published by : Varsha Bhasmare

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार शब्दांत टीका करत कार्यकर्त्यांना आक्रमक पण आत्मविश्वासाने लढण्याचे आवाहन केले. सध्याच्या राजकीय परिस्थितीत समोरची शक्ती पैशांच्या जोरावर, साम-दाम-दंड-भेद या सगळ्या मार्गांचा वापर करेल, असा इशारा देत ठाकरे यांनी, “निष्ठा आणि कणखरपणा काय असतो हे दाखवण्याची हीच वेळ आहे,” असे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना असं वाटतं की पैसे फेकले म्हणजे सगळं काही करता येतं. मात्र, “जर त्यांनी पैसे फेकले, तर तुम्ही त्यांना फेकल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला. पैसा, दबाव किंवा आमिष यांना बळी न पडता स्वाभिमानाने आणि ठामपणे उभे राहण्याचा संदेश त्यांनी दिला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी गाफील न राहण्याचा सल्ला दिला. “आपण जी कामं केली आहेत, ती आत्मविश्वासाने लोकांसमोर मांडा. तुमच्यासमोर जे लोक येतील, त्यांना थेट विचारा—तुम्ही मुंबईसाठी काय केलं?” असे आवाहन त्यांनी केले. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसेनेने केलेल्या विकासकामांचा, लोकहिताच्या निर्णयांचा ठोस उल्लेख करण्याची सूचना त्यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, समोरची लोकं पातळीवर यंत्रासारखी काम करत आहेत. सत्ता टिकवण्यासाठी ते कुठलाही मार्ग वापरायला मागे-पुढे पाहणार नाहीत. अशा वेळी कार्यकर्त्यांनी एकजुटीने उभं राहून पक्षाची भूमिका ठामपणे मांडणं गरजेचं आहे. “निष्ठा विकत घेता येत नाही, ती रक्तात असते,” अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या परंपरेचा उल्लेख केला.

उद्धव ठाकरे यांनी आगामी राजकीय घडामोडींचा संदर्भ देत १६ तारखेला “गुलाल उधळायचा आहे,” असा सूचक इशारा दिला. हा दिवस शिवसेनेसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. विजयाचा आत्मविश्वास व्यक्त करत, कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

भाषणाच्या शेवटी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत सांगितले की, शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नसून ती एक विचारधारा आहे. या विचारधारेची ताकद निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेल्या नात्यात आहे. “लोकांचा विश्वास हीच आपली खरी ताकद आहे. ती जपा आणि निर्भयपणे मैदानात उतरा,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा