ताज्या बातम्या

Operation Sindoor : '... अशी वेळ कोणावरही येऊ नये'; हिमांशी नरवाल झाली भावूक

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल शहीद झाले.

Published by : Rashmi Mane

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल शहीद झाले. त्यानंतर भारताने आज पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केला. ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना विनय यांची पत्नी हिमांशी नरवाल भावूक झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तसेच सरकारला कारवाई थांबवू नये, असे आवाहन तिने केले.

हिमांशी म्हणाली की, "माझे पती संरक्षण दलात होते आणि जेव्हा ते सामील झाले. तेव्हा त्यांना देशात शांतता हवी होती. निष्पापांचे प्राण जाऊ नये. या देशात द्वेष आणि दहशत नसावी. त्यांची भावना या ऑपरेशनमधून (ऑपरेशन सिंदूर) व्यक्त होत आहे. सरकार दहशतवाद आणि द्वेष सहन करू शकत नाही. भारताने आता इथेच थांबू नये. देशातून दहशतवाद संपवण्याची ही सुरूवात आहे. मी सध्या ज्या मनःस्थितीतून जात आहे, तसं कोणीही जाऊ नये, असं वाटतं."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...

Asia Cup 2025 IND vs PAK : हस्तांदोलन वादावरून पाकिस्तानचा संताप उफाळला! आयसीसीसमोर ठेवले अल्टिमेटम

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी