ताज्या बातम्या

'तो' वाघ अखेर जेरबंद ; चार जणांचा घेतला होता बळी

28 जून, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट व 4 नोव्हेंबर रोजी SAM - II या नर वाघाने चार जणांचा बळी घेतला.

Published by : Sagar Pradhan

अनिल ठाकरे|चंद्रपूर : चार जणांचा बळी घेणाऱ्या SAM - II या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वाघ जेर बंद झाल्याची माहिती करतात नागरिकांनी आनंद व्यक्त केला . चंद्रपूर जिल्ह्यात वाघ माणूस संघर्षाने टोक गाठलं आहे. दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात बळी जात आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याची ओळख वाघांच्या जिल्हा अशी आहे. जगप्रसिद्ध ताडोबात वाघांना बघण्यासाठी परदेशातील पर्यटक सुद्धा इथं येतात. मात्र आता वाघांनी जंगलाची सीमा ओलांडली आणि थेट गाववेशीवर येऊन धडकले आहेत. यातून वाघ माणूस संघर्षाने टोकं गाठले.वाघांचे सर्वाधिक हल्ले ब्रम्हपुरी परिसरातील वनपरिक्षेत्रात झालेत.

28 जून, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट व 4 नोव्हेंबर रोजी SAM - II या नर वाघाने चार जणांचा बळी घेतला. सातत्याने वाघाच्या हल्ल्यात मनुष्य हानीच्या घटना घडलेल्या होत्या. त्यानंतर या वाघावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आहे. कॅमेरा ट्रॅप मध्ये टिपण्यांत आलेल्या छायाचित्रांनुसार सदर च्या घटना SAM -II या नर वाघाने केल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा पासून या वाघाचे सनियंत्रण करून त्याच्या हालचालीवर वन विभाग लक्ष ठेऊन होते. सदर वाघाचा ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील शेतशिवारात नियमीत वावर असल्याने व मानवी जीविता कायम असल्याने त्यास जेरबंद करण्याची कार्यवाही सुरु होती. मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी SAM - II वाघास ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक 118 मध्ये सायंकाळी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डार्ट करुन बेशुद्ध केले व पिंजऱ्यात जेरबंद केले. यावेळी वन विभागाची संपूर्ण टीम होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pakistan News : ओळख विचारुन पंजाबमधील 9 जणांवर झाडल्या गोळ्या ; धक्कादायक प्रकार समोर

Gold Rate : सोन्याच्या दरात 27% वाढ ; गुंतवणूकदारांना लाभ, मात्र ग्राहकांच्या खिशाला कात्री

Ganpatipule Temple : गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड लागू होणार

Axiom Mission 4 मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर शुभांशु शुक्ला 14 जुलैला परतणार