ताज्या बातम्या

'तो' वाघ अखेर जेरबंद ; चार जणांचा घेतला होता बळी

28 जून, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट व 4 नोव्हेंबर रोजी SAM - II या नर वाघाने चार जणांचा बळी घेतला.

Published by : Sagar Pradhan

अनिल ठाकरे|चंद्रपूर : चार जणांचा बळी घेणाऱ्या SAM - II या नर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वाघ जेर बंद झाल्याची माहिती करतात नागरिकांनी आनंद व्यक्त केला . चंद्रपूर जिल्ह्यात वाघ माणूस संघर्षाने टोक गाठलं आहे. दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात बळी जात आहेत.

चंद्रपूर जिल्ह्याची ओळख वाघांच्या जिल्हा अशी आहे. जगप्रसिद्ध ताडोबात वाघांना बघण्यासाठी परदेशातील पर्यटक सुद्धा इथं येतात. मात्र आता वाघांनी जंगलाची सीमा ओलांडली आणि थेट गाववेशीवर येऊन धडकले आहेत. यातून वाघ माणूस संघर्षाने टोकं गाठले.वाघांचे सर्वाधिक हल्ले ब्रम्हपुरी परिसरातील वनपरिक्षेत्रात झालेत.

28 जून, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट व 4 नोव्हेंबर रोजी SAM - II या नर वाघाने चार जणांचा बळी घेतला. सातत्याने वाघाच्या हल्ल्यात मनुष्य हानीच्या घटना घडलेल्या होत्या. त्यानंतर या वाघावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आहे. कॅमेरा ट्रॅप मध्ये टिपण्यांत आलेल्या छायाचित्रांनुसार सदर च्या घटना SAM -II या नर वाघाने केल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हा पासून या वाघाचे सनियंत्रण करून त्याच्या हालचालीवर वन विभाग लक्ष ठेऊन होते. सदर वाघाचा ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील शेतशिवारात नियमीत वावर असल्याने व मानवी जीविता कायम असल्याने त्यास जेरबंद करण्याची कार्यवाही सुरु होती. मंगळवार 8 नोव्हेंबर रोजी SAM - II वाघास ब्रम्हपुरी उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक 118 मध्ये सायंकाळी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी डार्ट करुन बेशुद्ध केले व पिंजऱ्यात जेरबंद केले. यावेळी वन विभागाची संपूर्ण टीम होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा