Raj Thackeray MNS Pune aandolan
Raj Thackeray MNS Pune aandolan Team Lokshahi
ताज्या बातम्या

पाकिस्तान जिंदाबादला मनसे देणार 'हर हर महादेव' ने उत्तर

Published by : Vikrant Shinde

चंद्रशेखर भांगे | पुणे: काल पुण्यामध्ये PFI (Popular Front of India) च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाहू अकबर अश्या घोषणा दिल्या. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एक ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया दिली. 'ही कीड समूळ नष्टच करा' असं आवाहन त्यांनी केंद्रीय व राज्याचे गृहमंत्री यांना केलं. त्यानंतर आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे.

पुण्यात आज मनसेचं आंदोलन:

इस्लामिक दहशवाद्यांकडून पुणे गड बनवला गेला आहे असं चित्र काल-परवाच्या घटनेनं निर्माण झालं असल्याचा मनसेचा दावा आहे. इथे जर इस्लामिक मूलतत्ववादी "पाकिस्तान जिंदाबाद " च्या घोषणा देत असतील राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार देश रक्षणार्थ "हर हर महादेव" च्या घोषणा देऊन निदर्शन करणार असल्याचे मनसे कडून जाहीर करण्यात आलं आहे. याबाबत मनसे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी माहिती दिली आहे.

रविवार (२५ सप्टेंबर) दुपारी १ वाजता टिळक चौक (अलका टॉकीज चौक ) येथे मनसे आंदोलन करणार. असं पुणे मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया:

"एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.

ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे. हा गंभीर आरोपांखाली... थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत.

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे। तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील ( पा)। उच्चारता येणार नाही!

नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या। आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहठ्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावन पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल.

त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे."

अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी ट्वीट करून दिली आहे.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा