Jalgaon News : "अजून किती लाडक्या बहिण जाण्याची..." जळगावच्या 'त्या' भयानक घटनेवर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया  Jalgaon News : "अजून किती लाडक्या बहिण जाण्याची..." जळगावच्या 'त्या' भयानक घटनेवर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया
ताज्या बातम्या

Jalgaon News : "अजून किती लाडक्या बहिण जाण्याची..." जळगावच्या 'त्या' भयानक घटनेवर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया

जळगाव घटना: नवविवाहितेच्या आत्महत्येवर तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी.

Published by : Riddhi Vanne

थोडक्यात

जळगावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मयुरी ठोसर या नवविवाहितेने आत्महत्या केली

मयुरीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतला

यापार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव शहरातील सुंदरमोती नगर भागात राहणाऱ्या मयुरी गौरव ठोसर (वय 23) या नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या मयुरीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेतल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. मुळची बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी गावची असलेली मयुरीचा विवाह 10 मे रोजी गौरव ठोसरसोबत झाला होता.

मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्यावर सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू झाल्याचे तसेच पैशांची मागणी केली जात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 9 सप्टेंबर रोजी मयुरीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 सप्टेंबर रोजी दुपारी घरात कुणी नसताना तिने गळफास लावून आत्महत्या केली. तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे जळगाव चांगलेच हादरले आहे. यापार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया लोकशाही मराठीला दिल्या आहेत.

त्यावेळी त्या म्हणाल्या की, "खंर तर ही मोठी दुर्घटना आहे. आपण दर पाहिलं तर गेल्या दोन महिन्यापुर्वी वैष्णवी हगवण्याचं प्रकरण झालं आणि ग्रामीण भागात तर,सरास अशी प्रकरण होतं असतात. एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानतर माहेरच्या मंडळांकडून सासरच्या व्यक्तींना काही मिळतयं का? त्यांना देणारेच म्हणूनच त्या कुटुंबाकडे पाहिलं जात असत. आपल्याकडे कन्यादानानंतर सुद्धा माहेरच्यांकडे मागितले जाते. अशावेळी मुली असे टोकाचं पाऊल उचलते.

पुढे त्या म्हणाल्या की, "अशा अनेक लाडक्या बहिणी ज्या आहेत. त्या आपण बघतो की, वारंवार आत्महत्येचे प्रकरण किंवा आत्महत्येला प्रवृत्त होण्याचं प्रकरण वाढतायत. त्यामुळे मला वाटत की ह्या आरोपींना ताबडतोब अटक झालीच पाहिजे. सरकारची लाडकी बहिण योजना अश्या अनेक योजना सरकराकडे आहेत. परंतू अशा किती लाडक्या बहिण जाण्याची आपण वाट पाहतोय. हुंडाबळीच्या कायद्यामध्ये आधी आपणा बघितलं असेल तर तातडीने अटक किंवा त्या गोष्टी होत्या. नंतर त्या कायद्यामध्ये थोडाफार बदल झाला आहे."

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा