ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; रोहित पवार ट्विट करत म्हणाले...

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जालन्यातील कडवंची गावाजवळ ही घटना घडली. नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या इर्टिका कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने धडक दिल्याने हा अपघात झाला.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात होऊन यात सात जणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी आणि अत्यंत दुःखद आहे. मृत्यू झालेल्या या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे प्रवाशी जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत, ही सदिच्छा!

तसेच ते पुढे म्हणाले की, या मार्गावर वारंवार अपघात होऊन त्यात निरपराध लोकांचा बळी जात असल्याने सरकारने सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. असे रोहित पवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते