ताज्या बातम्या

Uday Samant: 'रायगडचे पालकमंत्री पद गोगावलेंनाच मिळायला हवं -सामंत

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आग्रही आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं. भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळायला पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोकणात 40 हजार कोटींची गुंतवणूक झाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

Published by : Prachi Nate

रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आजही आग्रही आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळायला पाहिजे ही माझी भावना आहे, असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दाओसमध्ये 15 लाख 70 हजाराची एमओयू झाली असून त्यात 40 हजार कोटीची गुंतवणुक रत्नागिरीत झाल्याबद्दल मी समाधानी असल्याच वक्तव्य देखील उदय सामंत यांनी केलेलं आहे.

तसेच 40 हजार कोटीच्या गुंतवणुकीमुळे कोकणात सुबत्ता येईल असं आश्वासन उदय सामंत यांनी दिल आहे. मुस्लिम मतं काँग्रेसकडे होती, ती UBTकडे ट्रान्सफर झाली असं मोठ वक्तव्य देखील उदय सामंत यांनी केलेलं आहे. UBTचं राजकीय धोरण काय आहे हे नेमकं कळत नाही असं देखील उदय सामंत म्हणाले आहेत.

पुढे उदय सामंत म्हणाले की, संविधानाच्या बाबतीत फेक नेरेटीव्हचा फुगा आम्ही फोडून टाकलेला आहे... संविधानाच्या बाबतीत आमची आदराची भूमिका आहे, संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्याचा विचार जो करेल त्याच्य विरोधात शिवसेना उभी राहील... अनेक आमदार हे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकाराण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना कोणती आहे, लोकांना कळायला लागले आहे...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य

Latest Marathi News Update live : विधानभवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला चंदनापुरी घाटात अपघात, विद्यार्थी जखमी