ताज्या बातम्या

Uddhav Thackeray : जर कुठे गद्दारी किंवा बंडखोरी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ती त्यांनी थांबवली पाहिजे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत विशाल पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, जागावाटप झालेलं आहे. तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केलेलं आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आता जर कुठे काही गद्दारी किंवा बंडखोरी होत असेल तर त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे. ती त्यांनी थांबवली पाहिजे. अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?