Uddhav Thackeray Press Conference 
ताज्या बातम्या

ठाकरे गटाकडून लोकसभेचे ४ उमेदवार जाहीर, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले,"...तर देश संपणार"

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने चार उमेदवार घोषित केले आहेत. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.

Published by : Naresh Shende

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने चार उमेदवार घोषित केले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजीत पाटील, जळगावमधून करण पवार, तर पालघरमध्ये भारती कामडी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी या उमेदवारांची नावे घोषित करतानाच मोदी सरकारवर हल्लाबोलही केला. धक्का खाणारी शिवसेना नाही, तर शिवसेना जोरात धक्का देते. यावेळी देशात पुन्हा एका पक्षाचं सरकार आलं, तर देश संपला म्हणून समजा, असं म्हणत ठाकरेंनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. तसंच यावेळी उन्मेश पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.

ठाकरे पुढे म्हणाले, राजकारणात बदल गरजेचा आहे. देश हुकूमशाहीच्या दिशेनं चालला आहे. आमच्या पक्षात गद्दारी झाली. भाजप वेगळ्या दिशेनं जात असल्यानं उन्मेश पाटील पक्षप्रवेश करत आहेत. बंड कशाला म्हणतात, ते उन्मेश पाटलांनी दाखवून दिलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी राऊतांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. भविष्यात मविआसोबत काही जमणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेऊ नये. मुंबईच्या दोन जागांवर मविआमध्ये विचार सुरु आहे. सांगलीचा प्रचारही सुरु झालेला आहे. काँग्रेसने जागावाटप केल्याप्रमाणे पुढील कामाला सुरुवात करावी.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा