ताज्या बातम्या

मुंबईत भाजीपाला महागला; भाज्यांच्या दरात 'इतक्या' टक्क्यांची वाढ

मुंबईत भाजीपाला महागला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुंबईत भाजीपाला महागला असल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन भाज्यांचे दर वाढल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई एपीएमसीत भाज्याची आवक घटल्याचे पाहायला मिळत आहे.

भाज्याच्या दरात 25 ते 30 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती मिळत असून टोमॅटोची 1800 क्विंटल, फ्लॉवर 824 क्विंटल, शिमला मिरची 754 क्विंटल आणि हिरवा वाटाण्याची 180 क्विंटल आवक झाल्याची माहिती आहे.

यासोबतच टोमॅटो, शिमला मिरची, फ्लॉवर शंभरीपार गेल्याचे पाहायला मिळत आहे. वाटाणा प्रतिकिलो 130 ते 140 रुपयांवर पोहचला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोने शंभरी गाठली आहे.

गेल्या आठवड्यातील पावसाचा भाज्यांना फटका बसल्याचे पाहायला मिळत असून पावसामुळे भाज्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. या महागाईने मात्र सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी