ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election : बहुजन विकास आघाडीची तीन मतं कुणाला? अद्याप सस्पेन्स कायम

विधान परिषदेच्या निवडणुकीत लहान पक्ष व अपक्ष आमदारांची १५ मते असून, ती निर्णायक ठरणार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांसाठी भाजप, काँग्रेस आणि 'राष्ट्रवादी'च्या उमेदवारांनी त्या पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटी घेतल्या.

Published by : Shweta Chavan-Zagade

संदीप गायकवाड | विरार : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सहा आणि भाजपचे पाच उमेदवार रिंगणात असून, महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.आज, सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर सायंकाळी पाचनंतर मतमोजणी सुरू होणार आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीची (Bahujan Vikas Aghadi) तीन मते विधानपरिषदेसाठी कोणाला मिळणार हे अजूनही गुलदस्यात आहेत. सर्व पक्षासाठी ही तीन मतं महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसापासून सर्व पक्षाचे उमेदवार नेते मंडळी आमदार हितेंद्र ठाकूरांची (Hitendra Thakur) गाठीभेठी घेत होते.

आमदार क्षितीज ठाकूर (Kshitij Thakur) हे आज मतदनासाठी येणार का हा सस्पेन्स आता मिटला आहे. ते आज पहाटे सव्वा तीन वाजता मुंबईत दाखल झाले आहेत. ते मुंबईहून विधानपरिषदेत दाखल होणार आहे. हितेंद्र ठाकूर आणि राजेश पाटील हे विरारहून दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान मुंबईला निघणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज