ताज्या बातम्या

"मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी...", 26/11 हल्ल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन वडेट्टीवार यांचा माधव भंडारी यांच्यावर पलटवार

भंडारी यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती.

Published by : Shamal Sawant

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 साली आतंकवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप जीव मारले गेले. दरम्यान आता या हल्ल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली होती. "मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचा हात होता",असा खळबळजनक दावा केला होता. भंडारी यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. अशातच आता कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले कि, "सध्या माधव भंडारी यांना चिंता आहे. माधव भंडारी भाजपमध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही त्यामुळे बिचाऱ्यांना असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळ उडवून त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो. जे आरोप माधव भंडारी यांनी केले खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या माणसांनी करावे असे ते आरोप आहेत".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू