ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : OBC आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Published by : Siddhi Naringrekar

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तसेच ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार कशापद्धतीने बघतंय तो सरकारचा विषय आहे. अलिकडे जे आम्ही महाराष्ट्रातील चित्र बघतो आहे आता पूर्वीसारखी काही आंदोलनाला धार दिसत नाही.

वारंवार आंदोलन करुन अर्धवट सोडणं म्हणजे समाजाचे नुकसान आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला सरकारने कशापद्धतीने घ्यायचे ते सरकार ठरवेल. पण आमची सरकारला मागणी आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 28 तारखेला ओबीसीच्या आरक्षणाच्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात केस आहे. पूर्वीप्रमाणे ओबीसीचे आरक्षण निर्णय झाल्याशिवाय किंवा तो दिल्या शिवाय कुठल्याही निवडणुका राज्यात होऊ देणार नाही. ओबीसीचे आरक्षण डावलून जर सरकार निवडणुका घेत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी समाज हे सहन करणार नाही.

साधारणता 50 हजार जागा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसीच्या हक्काच्या आहेत. तो हक्क मारण्याचे काम जर सरकार करेल तर आम्ही सरकारला सोडणार नाही. हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा