ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे. शेतकरी अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम होतो. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे राज्य आणि केंद्र सरकार दोघांचे लक्ष नाही.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, काल चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांसोबत बसून विचारपूस केली. शेतकऱ्यांचं सरकार आहे हा ढोल बडवणाऱ्या सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांनी कधी २ मिनिटं तरी निवांत शेतकऱ्यांसोबत बसून विचारपूस करावी. शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्या सरकार बद्दल काय मत आणि विचार आहे हे त्यांना कळेल! असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा