ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 24 एप्रिलला रत्नागिरी दौरा; विनायक राऊत म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 24 एप्रिलला रत्नागिरी दौरा आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक राऊत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रत्नागिरीला येत आहेत. याचाच अर्थ रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असेल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. पण मी अजूनही सांगू इच्छितो मागच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा मागच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा प्रत्यक्ष नरेंद्र मोदी साहेबांच्यासुद्धा 2 सभा कणकवली आणि रत्नागिरीला झाल्या होत्या. त्यावेळेलासुद्धा नरेंद्र मोदी साहेबांची सभा होऊनसुद्धा भाजपच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता.

तसेच विनायक राऊत पुढे म्हणाले की, यावेळेला अमित शाह जरी आले तरी आमचा कोकण म्हणजे बाळासाहेबांचा कोकण, उद्धवजी ठाकरेंचा कोकण त्याच्यामध्ये कुणीही दुरावा निर्माण करु शकणार नाही. असे विनायक राऊत म्हणाले.

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...